खूप पुस्तकं वाचली. तशी ती संख्येने कमीच असतील पण जी वाचली त्या पुस्तकांनी आयुष्याला दिशा दिली. वाचता वाचता विवेकानंद माझ्या जीवनात आले आणि आजपर्यंत माझ्या जीवनाचा मेळच लागला नाही. खरं तर विवेकानंद हे तुपासरखे आहेत. तुपाचा गुण येतो पण सगळ्यांना नाही. मला मात्र गुण आला. नंतरच्या वाचन प्रवासात विवेकानंद मध्यवर्ती राहिले आणि इतर विषय त्यांच्याभोवती वर्तुळाकार फिरत राहिले. म्हणजे इतर काही वाचले की विवेकानंदांजवळ पुन्हा यावं लागतं. मगच ते वर्तुळ पूर्ण होतं. विवेकानंदांच्या कर्मयोगांमुळे मी कर्करोगासारख्या दुर्धर आजारात वडिलांची न थकता बारा-तेरा वर्ष अविरत सेवा करू शकलो. विवेकानंदांच्या भक्तियोगांमुळे भक्तिमय खरखुर आयुष्य जगता आलं. त्यांचाच ज्ञानयोगांमुळे जास्त नाही पण ज्ञानी होण्याच्या मार्गावर निदान प्रवास करू लागलोय. अजून बरंच बरंच त्यांच्याकडून मी घेतलंय. जेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हते, तेव्हा त्यांनीच मला मोलाची साथ दिली. वडिलांच्या पश्चात पुस्तक लिहिण्याची कल्पना विवेकानंदानीच दिली. अगदी पुस्तक प्रकाशित होईपर्यंत आणि आजही हीच प्रेरणा मनात आहे. जगण्याचं बळ, अवसान आणि प्रचंड ऊर्जा वाचलेल्या पुस्तकातून मिळाली.
खूप पुस्तक वाचता-वाचता लेखक झालो. या प्रवासात पुस्तकं सतत बरोबर आहेत. अनेक लोकं आयुष्यातून गेली, काही नाविनही आयुष्यात जोडली गेली. पुस्तक मात्र तेंव्हाही होती व आजही आहेत. अनेकांनी कौतुक केलं, अनेकांनी मला राजरोसपणे फसवलं, काही आजही तसा प्रयत्न करताहेत. पण पुस्तकांनी आयुष्यात भरभरून दिलं, देत आहेत. असो. पुस्तक दिनानिमित्त मनातलं थोडं, पुस्तकातील थोडं......
©Harish Gore
No comments:
Post a Comment
Thank you